मदारी: चेहरा नसलेल्याची असहाय्यता
हिंदुस्तानी सिनेमातला भ्रष्टाचाराला विटलेला म्हातारा नायक सेनापती हातात हत्यार घेतो तर नायक सिनेमातला न्यूज रिपोर्टर शिवाजी राव राजकारणांच्या कोडग्या वृत्ती विरुद्ध लढण्यासाठी एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याला तयार होतो जेणेकरून व्यवस्थेच्या आतून त्याची स्वच्छता करता येईल. दोन्हीकडे भारतातील सरकारी यंत्रणेतला सर्वच पातळीवर होणारा भ्रष्टाचार हा विषय केंद्रस्तानी होता. त्यातील नायकांना त्यांच्या कुवतीनुसार ते करायचं होतं. सिनेमाच्या काळाच्या चौकटीला झुकारून अशक्य वाटतील असे अवास्तववादी कृत्यही त्यांनी केलेले आहेत. दोन्ही सिनेमे किंवा या आधी या विषयांवर आलेले सिनेमे भ्रष्टाचारच्या मुळाशी न जाता वरवर त्यावर चित्र चौकटीला शोभतील असे उत्तर देऊन कथा मांडायचे. निशिकांत कामत दिग्दर्शित मदारीमध्ये हाच विषय थोड्या अधिक नीट पद्धतीने आलाय असं म्हणता येईल. देहरादूनमधून रोहन गोस्वामीचं (विशेष बन्सल) अपहरण होतं. रोहन केंद्रीय गृहमंत्री प्रशांत गोस्वामींचा (तुषार दळवी) मुलगा असतो. केंद्रीय मंत्र्याचा मुलगा म्हटल्यावर संपूर्ण सरकारी यंत्रणा त्याला शोधण्यासाठी कार्यान्वित केली जाते. मंत्री सक्ष...