Posts

Showing posts from July, 2016

मदारी: चेहरा नसलेल्याची असहाय्यता

Image
हिंदुस्तानी सिनेमातला भ्रष्टाचाराला विटलेला म्हातारा नायक सेनापती हातात हत्यार घेतो तर नायक सिनेमातला न्यूज रिपोर्टर शिवाजी राव राजकारणांच्या कोडग्या वृत्ती विरुद्ध लढण्यासाठी एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याला तयार होतो जेणेकरून व्यवस्थेच्या आतून त्याची स्वच्छता करता येईल. दोन्हीकडे भारतातील सरकारी यंत्रणेतला सर्वच पातळीवर होणारा भ्रष्टाचार हा विषय केंद्रस्तानी होता. त्यातील नायकांना त्यांच्या कुवतीनुसार ते करायचं होतं. सिनेमाच्या काळाच्या चौकटीला झुकारून अशक्य वाटतील असे अवास्तववादी कृत्यही त्यांनी केलेले आहेत. दोन्ही सिनेमे किंवा या आधी या विषयांवर आलेले सिनेमे भ्रष्टाचारच्या मुळाशी न जाता वरवर त्यावर चित्र चौकटीला शोभतील असे उत्तर देऊन कथा मांडायचे. निशिकांत कामत दिग्दर्शित मदारीमध्ये हाच विषय थोड्या अधिक नीट पद्धतीने आलाय असं म्हणता येईल. देहरादूनमधून रोहन गोस्वामीचं (विशेष बन्सल) अपहरण होतं. रोहन केंद्रीय गृहमंत्री प्रशांत गोस्वामींचा (तुषार दळवी) मुलगा असतो. केंद्रीय मंत्र्याचा मुलगा म्हटल्यावर संपूर्ण सरकारी यंत्रणा त्याला शोधण्यासाठी कार्यान्वित केली जाते. मंत्री सक्ष...

मला उद्धवस्त व्हायचंय् व इतर आत्मकथने

Image
आत्मकथन हा मराठीतला स्थिरावलेला साहित्यप्रकार. आयुष्य जगताना आलेले अनुभव, विशिष्ट विचारसरणी घेऊन केलेलं काम अशा असंख्य विषयांच्या अनुषंगाने लेखन झालं आहे. त्यातही दलित आत्मकथन जास्त प्रमाणात चर्चिले गेले. त्यावर अभ्यास केला जातोय. दलित साहित्य सर्वदूर पसरण्याचं व प्रभावित करण्याचं काम आत्मकथनांनी मोठ्या प्रमाणात केलं हे तर सर्वश्रुत आहे. त्याचबरोबर इतरांनी सुद्धा आपल्या वाट्याला आलेले सुख-दु:ख कुठंतरी लिहून ठेवण्यासाठी आत्मकथन या साहित्यप्रकाराचा वापर केला. त्याला प्रतिसाद चांगला मिळालाय हे पण बघण्यात आलंय. आत्मकथानाला मर्यादा असते. ज्या व्यक्तीचे आत्मकथन आहे त्याने त्याच्या आकलनातून जगाकडे बघून ते लिहिलं असल्यामुळे त्याच्या नजरेला, दृष्टीकोनाला मर्यादा पडतात. सांगत असणाऱ्या वस्तुस्थितीचं सम्यक चिकित्सा होईलच याची शक्यता कमी असते. आत्मकथन म्हणजे अन्याय झालेला असणं (सर्वच अर्थाने) हा प्रमुख विषयवस्तू असणं हे सुद्धा दिसतं. काही काही आत्मकथन ही कंटाळवाणी तसेच आपल्याला व्यक्त व्हायचच आहे या अट्टाहासाने लिहिलीयत असं जाणवतं. त्यामुळे गेल्या काही वर्षात आत्मकथनांची पीछेहाट झालीय असं द...