Posts

Showing posts from December, 2020

कोरोना काळ, फोबिया आणि दहशत

Image
जानेवारीत नेहमीसारखी वर्षाची सुरूवात झाली. आयुष्य नॉर्मल होतं. दिल्लीतील विद्यापीठात विद्यार्थ्यांवर हल्ला झाला म्हणून मोठ्या प्रमाणात निदर्शनं चालू झाली होती. फेब्रुवारीत परत दिल्लीतच दंगली उसळल्या. केंद्र सरकारच्या या फेजमध्ये अजून काय काय बघायला मिळणार अशी चर्चा ऐकू यायला लागली. याच काळात चीनमध्ये कोरोना नावाचा एक व्हायरस पसरला आहे. तो संसर्गजन्य आहे. त्याने तात्काळ माणूस मरतो असं ऐकण्यात यायला लागलं. इटलीमध्ये केसेस वाढायला लागल्यावर इतर देशात सुद्धा तो पसरतोय हे बातम्यातून कळायला लागलं. विमानाने प्रवास करणाऱ्यांमुळे तो मोठ्या प्रमाणात पृथ्वीभर पसरतोय असं सुरूवातीच्या पाहणीतून लक्षात आलं. पँडेमिकची सुरूवात झाली होती. ३० जानेवारीलाच वूहान प्रांतातून परतलेल्या केरळमधील एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. तो भारतातला पहिला कोरोनाबाधित. २४ मार्चला रात्री बारापासून देशात लॉकडाऊन करण्यात आलं. ते का केलं, कशासाठी केलं हे कळण्या अगोदरच सगळं बंद करण्यात आलं. जीवनावश्यक वस्तू घेण्याची मुभा असली तरी संपूर्ण शहर बंद केलं गेलं होतं. लातूर बंद किंवा भारत बंद बघण्याची सवय अस...

न भावलेला ‘सुपर ३०’

Image
ऋतिक रोशन अभिनीत ‘सुपर ३०’ मधील सर्वात चांगला प्रसंग म्हणजे आनंदकुमारला लल्लनमुळे आपण किती मोठी घोडचूक केली याची जाणीव होते तो. सिनेमातील इतर गोष्टी मात्र नेहमीची कथा वाटली. मी व्यक्तिशः शिक्षणव्यवस्थेवरील भारतीय सिनेमांपासून दूरच राहतो. त्याला एक कारण आहे. मी एकूण बारा वर्षे महाविद्यालयात घालवली आहेत. बारावी सायन्सची दोन, बीकॉमची दोन, बीएस्सीची तीन वर्ष (बीकॉम-बीएस्सी मिळून पाच वर्ष. सर्व विषयात नापास.) आणि त्यानंतर बीए-एमए. महत्त्वाच्या सर्व विद्याशाखांचा अनुभव घेतल्यामुळे एकूणच शिक्षणाबद्दल आजही मनात कटुताच आहे. त्यामुळे सिनेमात जेव्हा शिक्षणावर भाष्य केल्याच्या थाटात कथा मांडली जाते तेव्हा मला त्याचवेळी अंदाज आलेला असतो की कथानक खूपच ढोबळ स्वरूपात मांडलेलं असणार. वास्तव दाखवण्याचं धारिष्ट्य अजून तरी निर्माता-दिग्दर्शकांनी दाखवलेलं नाही. चर्चेपुरती चटकन आठवणारी नावे म्हणजे ‘दहावी फ’, ‘तारे जमीं पर’ आणि ‘थ्री इडियट्स’. तिन्हीत शिक्षणव्यवस्थेचं बऱ्यापैकी चित्रण केलं आहे. तरीही मला हे सिनेमे तितकेसे प्रभावी वाटत नाहीत जितके ते असावयास हवेत. त्याचं कारण आपल्या सामाजिक रचनेत व नेणीवेत आह...