लातूर पॅटर्न कादंबरी का दुर्लक्षिली गेली?
काही दिवसांपूर्वी फेसबुकवर मित्र भारत निलखने मराठीतील दुर्लक्षित लेखक अशा अर्थाची पोस्ट टाकली होती व इमॅन्युलने मला टॅगलं होतं. त्या पोस्टमुळेच मला हे लिहावंसं वाटलं. पार्श्वभूमी २०११ मध्ये कादंबरीचं प्रकाशन झालं. यावर्षी दहा वर्ष होतील कादंबरीला. प्रकाशन झाल्यावर वाटलं होतं लवकरच सर्व थरातून तिची दखल घेतली जाईल. या विषयावर लिहिणारे पहिले आपणच म्हटल्यावर उत्साहाने वाचक त्याचं स्वागत करतील. समीक्षा होईल. पुरस्कार मिळतील. असं किमान वर्षभर तरी वाटत होतं. बऱ्याच पुरस्कारांसाठी पाठवली. राज्य ते विविध ठिकाणच्या स्थानिक पुरस्कारांना पाठवली. अगदी पुण्याच्या नगर वाचन मंदिराच्या पुरस्कारासाठी स्वतः तिथे जाऊन देऊन आलो होतो. तसेच साहित्य अकादमी युवा पुरस्कार देते ३५ वर्षांखालील लेखकांच्या पहिल्या साहित्यकृतीला. मला आता नीटसं आठवत नाही पण अक्षरमानवने किंवा की मी त्यांचा फॉर्म भरून पाठवला होता बहुदा नाही सुद्धा. त्यामुळे तो मिळेल निदान वयाच्या अटीत बसत होतो म्हणून. पण कुठून कसलाच प्रतिसाद आला नाही. कादंबरी प्रकाशित झाल्यावर पेपरात परीक्षणे/समीक्षा छापून येईल म्हणून महिनाभर प्रत्येक पेपरची रविवारची...