Posts

Showing posts with the label Vinay Pathak

चिंटू का बर्थडे आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्स

Image
विसाव्या शतकाची असंख्य वैशिष्ट्ये आहेत. पैकी एक म्हणजे जगभरात स्थलांतरितांचा झालेला प्रवास. एका देशातून दुसऱ्या देशात जाणाऱ्यांची संख्या विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात झाल्याची दिसून येते. खासकरून पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपातून अमेरिकेत व त्यानंतर जगाच्या इतर भागातून युरोप अमेरिकेत स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली दिसून येते. स्थलांतरित होण्याची कारणे बरीच आहेत. पैकी आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक ही मुख्य कारणे. आर्थिक कारण हे त्यातल्या त्यात ठळकपणे स्थलांतरित होण्यासाठी मजबूर करणारं. स्थलांतरित जरी वैध मार्गाने होणारं असलं तरी अवैध मार्गाने होणाऱ्यांची संख्या सुद्धा तितकीच आहे. किंवा असे म्हणता येईल वैध मार्गाने जाणाऱ्यांपेक्षा अवैध मार्गाने जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. लालफितीच्या कारभारामुळे वैध ऐवजी अवैध मार्ग स्वीकारणारे बरेच दिसतात. त्यामुळे आजच्या काळात स्थलांतरितांचं जगणं ही एकाचवेळी त्या त्या भूभागासाठी पर्वणी आहे तर समस्या सुद्धा. पर्वणी या अर्थाने की शिकून नोकरी, व्यवसायासाठी जाणारा वर्ग हा तिथल्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी आयुष्य...