Posts

Showing posts with the label Dahavi Fa

न भावलेला ‘सुपर ३०’

Image
ऋतिक रोशन अभिनीत ‘सुपर ३०’ मधील सर्वात चांगला प्रसंग म्हणजे आनंदकुमारला लल्लनमुळे आपण किती मोठी घोडचूक केली याची जाणीव होते तो. सिनेमातील इतर गोष्टी मात्र नेहमीची कथा वाटली. मी व्यक्तिशः शिक्षणव्यवस्थेवरील भारतीय सिनेमांपासून दूरच राहतो. त्याला एक कारण आहे. मी एकूण बारा वर्षे महाविद्यालयात घालवली आहेत. बारावी सायन्सची दोन, बीकॉमची दोन, बीएस्सीची तीन वर्ष (बीकॉम-बीएस्सी मिळून पाच वर्ष. सर्व विषयात नापास.) आणि त्यानंतर बीए-एमए. महत्त्वाच्या सर्व विद्याशाखांचा अनुभव घेतल्यामुळे एकूणच शिक्षणाबद्दल आजही मनात कटुताच आहे. त्यामुळे सिनेमात जेव्हा शिक्षणावर भाष्य केल्याच्या थाटात कथा मांडली जाते तेव्हा मला त्याचवेळी अंदाज आलेला असतो की कथानक खूपच ढोबळ स्वरूपात मांडलेलं असणार. वास्तव दाखवण्याचं धारिष्ट्य अजून तरी निर्माता-दिग्दर्शकांनी दाखवलेलं नाही. चर्चेपुरती चटकन आठवणारी नावे म्हणजे ‘दहावी फ’, ‘तारे जमीं पर’ आणि ‘थ्री इडियट्स’. तिन्हीत शिक्षणव्यवस्थेचं बऱ्यापैकी चित्रण केलं आहे. तरीही मला हे सिनेमे तितकेसे प्रभावी वाटत नाहीत जितके ते असावयास हवेत. त्याचं कारण आपल्या सामाजिक रचनेत व नेणीवेत आह...

दहावी फ : वस्तुस्थितीपासून फारकत घेणारा सकारात्मक पलायनवादी

Image
२००२ साली जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला होता तेव्हा मी नापास होण्याच्या तिसऱ्या वर्षात होतो (एकूण पाच वर्ष नापास होतो.). सिनेमा बघितला असता तर कदाचित त्यातील कथानकाला भारावून जाऊन रडलो सुद्धा असतो. नंतर जेव्हा बीएस्सी सोडून बीए केलं तेव्हा आपण किती भयानक अनुभवातून गेलो आहोत याची तीव्रतेने जाणीव झाली. तसेच आजूबाजूची परिस्थिती या चित्रपटात दाखवलेली आहे तशी खचितच नाही हे पण लक्षात आलं. एमए नंतर हे अनुभव लिहून नापास मुलांची सद्यस्थिती काय आहे हे मांडावं म्हणून लातूर पॅ टर्न नावाची कादंबरी लिहिली. काल रात्री जेव्हा मी हा सिनेमा बघितला तेव्हा मी ज्या अनुभवातून गेलो त्याचं पडद्यावर दर्शन होईल अशी इच्छा होती पण सिनेमाने खूप म्हणजे खूपच निराशा केली.  हा सिनेमा मला सकारात्मक पलायनवादी वाटला. यातील दाखवलेली गोष्ट प्रत्यक्षात घडू शकते हे मान्य पण दिग्दर्शक-कथा-पटकथाकारांचा दृष्टीकोन शिक्षण घेणं हे किती गरजेचं आहे या वर भर देणारा वाटला. उदा. पट्या नावाचं एक पात्र आहे जे की त्याच्या काकाकडे राहत असतो.  तो शाळा झाली की काकाला त्याच्या व्यवसायात मदत करत असतो. हा व याच्या तुकडीतले...