तमाशा : व्हाय आल्वेज द सेम स्टोरी!
श्रीमंत नायक-नायिका असूनही त्यांचे सामान्य माणसांसारखे जमिनीवर वावरणे, हिंदी प्रेमपटांचे टिपिकल संवाद आणि दृश्ये यांची व्यक्तीरेखांकडून जमेल तितकी, जमेल तशी खिल्ली उडवणे. बहुतांश चित्रपटाच्या केंद्रभागी असणाऱ्या मुंबईऐवजी आपल्या दिल्ली शहराला कथानकामध्ये प्राधान्य देणे. आणि प्रमुख व्यक्तिरेखांचा प्रेमाबाबत प्रचंड गोंधळ असणे, या गोंधळामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांमधून व्यक्तिरेखांच्या वैयक्तिक आयुष्यात अमूलाग्र बदल घडवून आणणे, त्यानंतर मग पारंपारिक बॉलीवूडी मसाल्याचाच शेवटला आधार घेत चित्रपट तारून नेणे, हे त्याच्या चित्रपटांमधील ठराविक आलेख आहेत. --इम्तियाज अली, तरुणाईचे चित्रपट आणि लव्ह आज कल पंकज भोसले, लोकप्रभा २१ ऑगस्ट २००९ पंकज भोसलेंनी केलेलं इम्तियाजचं विश्लेषण किती योग्य आहे हे त्याचे सर्व सिनेमे बघून जाणवतं. थोडा फरक असेल तर तो हायवे या मागच्या वर्षी आलेल्या सिनेमात. स्टॉकहोम सिंड्रोमचा बळी ठरलेल्या नायिकेची कथा असं त्याचं स्वरूप होतं. निश्चित कळसाध्याय नसल्यामुळे शेवट प्रभावी नव्हता. तसेच सोचा न था पासून असणारी ट्रेडमार्क शैली त्यात गायब होती जरी नायक-नायि...