Posts

Showing posts with the label Highway

तमाशा : व्हाय आल्वेज द सेम स्टोरी!

Image
श्रीमंत नायक-नायिका असूनही त्यांचे सामान्य माणसांसारखे जमिनीवर वावरणे, हिंदी प्रेमपटांचे टिपिकल संवाद आणि दृश्ये यांची व्यक्तीरेखांकडून जमेल तितकी, जमेल तशी खिल्ली उडवणे. बहुतांश चित्रपटाच्या केंद्रभागी असणाऱ्या मुंबईऐवजी आपल्या दिल्ली शहराला कथानकामध्ये प्राधान्य देणे. आणि प्रमुख व्यक्तिरेखांचा प्रेमाबाबत प्रचंड गोंधळ असणे, या गोंधळामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांमधून व्यक्तिरेखांच्या वैयक्तिक आयुष्यात अमूलाग्र बदल घडवून आणणे, त्यानंतर मग पारंपारिक बॉलीवूडी मसाल्याचाच शेवटला आधार घेत चित्रपट तारून नेणे, हे त्याच्या चित्रपटांमधील ठराविक आलेख आहेत. --इम्तियाज अली, तरुणाईचे चित्रपट आणि लव्ह आज कल पंकज भोसले, लोकप्रभा २१ ऑगस्ट २००९ पंकज भोसलेंनी केलेलं इम्तियाजचं विश्लेषण किती योग्य आहे हे त्याचे सर्व सिनेमे बघून जाणवतं. थोडा फरक असेल तर तो हायवे या मागच्या वर्षी आलेल्या सिनेमात. स्टॉकहोम सिंड्रोमचा बळी ठरलेल्या नायिकेची कथा असं त्याचं स्वरूप होतं. निश्चित कळसाध्याय नसल्यामुळे शेवट प्रभावी नव्हता. तसेच सोचा न था पासून असणारी ट्रेडमार्क शैली त्यात गायब होती जरी नायक-नायि...

हायवे एक सेल्फी आरपार : आयुष्याचा कोलाज

Image
प्रवास सर्वचजण करतात. कधी स्वतःच्या वाहनाने, कधी खाजगी नाहीतर सरकारी बसने, कधी टॅक्सीत तर कधी ट्रकने. हा प्रवास कोणत्या आर्थिक थरातले आहात तसेच कुठे जायचे आहे यावर अवलंबून असतो. म्हणजे एखादी एनआरआय व्यक्ती ट्रकमध्ये लिफ्ट घेऊन प्रवास करणार नाही की ज्याची आर्थिक परिस्थिती खूपच कमी आहे ज्याला सरकारी किंवा खाजगी बस परवडणार नाही तो भाड्याने कार किंवा टॅक्सी नाही घेणार. तसच प्रवास आड बाजूच्या रस्त्याने न करता एखाद्या हायवेवर किंवा एक्स्प्रेस हायवेवर होणार असेल तर प्रवास करणाऱ्यासोबत असंख्य लोकं इतर गाड्यांमध्ये असतात. त्यावेळी जो व्यक्ती ज्या वाहनातून जात असेल तो आजूबाजूच्या गाड्यात कोण लोकं आहेत याचा विचार करत नाही. तो त्यांच्या आयुष्याला कुठेही छेदणार नाही किंवा ते त्याच्या आयुष्यात येऊन गोंधळ घालणार नाहीत. तरीही प्रवासा दरम्यान कधीतरी एखादा प्रवासी दुसऱ्याचा विचार करत असेल का! करतात का नाही हे सांगता नाही येत पण उमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी या पटकथाकार-दिग्दर्शक जोडीने तसा विचार केलेला आहे. हायवे सिनेमा चालू होतो मुंबईतल्या नेहमीच्या सकाळी. पडद्यावर दिसतं असंख्य पात्र वेगवे...