Posts

Showing posts with the label Tisca Chopra

लवशुदा : मळलेल्या वाटेमुळे निराशा

Image
रोमँटिक कॉमेडी किंवा रॉमकॉम या सिनेमा प्रकारची एका शब्दकोशातील व्याख्या अशी आहे, “एक असा विनोदी सिनेमा, नाटक किंवा टेलिव्हिजन प्रोग्राम की ज्या प्रेमकथेचा शेवट सुखांत असतो.” हा सिनेमाचा खूपच लोकप्रिय प्रकार. त्याचं मुख्य कारण म्हणजे हसू आणि आसू याचं एकत्रित चित्रीकरण जे प्रेक्षकांना भावतं, चटकन आपलंसं करतं. जीवन हे हसू आणि आसू याचं मिश्रण असतं अशा पद्धतीने सार्वत्रिक समजलं जातं त्याचं प्रतिबिंब म्हणजे रॉमकॉम सिनेमा. या निमित्ताने चटकन आठवावीत अशी नावे म्हणजे ‘चीनी कम’, ‘दिल है की मानता नहीं’, ‘जब वी मेट’ किंवा हृषिदांचा क्लासिक ‘गोलमाल’. गिरीश कुमार-नवनीत कौर ढिल्लन अभिनीत लवशुदा असाच एक रॉमकॉम आहे. गौरव (गिरीश कुमार) त्याच्या खोलीत अस्ताव्यस्त झोपलाय. त्याच्या पलीकडून एक मुलगी, पूजा (नवनीत कौर ढिल्लन) उठते. गौरव हतबुद्ध होतो ही कुठनं आली कारण त्याच दिवशी त्याची एंगेजमेंट असते. तिचा रात्रीतून हरवलेला टॉप शोधत न बसता तिला त्याच्या होणाऱ्या सासूने खास बनवलेला शर्ट घालायला देऊन पळवून लावतो. पण नंतर लक्षात आल्यावर तिला शोधणं आलंच. त्याला तिचं नाव सुद्धा माहिती नसतं. आदल्या रात...

घायल वन्स अगेन : घायल वन्सच पुरे

Image
एखाद्या कथानकात शेवटी नायकाचा विजय झाल्यावर काही प्रश्नांची उत्तरे तशीच राहतात उदाहरणार्थ नायकाने खलनायकाला मारल्यावर जेलमधनं सुटून आल्यावर तो पुढे काय करतो. नोकरी करतो की धंद्याला लागतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या त्याच्यासाठी प्राथमिक निकड असते का. त्याने केलेलं कृत्य पुढे त्याचं नायकत्व अबाधित ठेवतं की त्याला सर्वसामान्य आयुष्य कंठायला लागतं. ही उत्तरं मिळत नाहीत कारण नंतरच्या अध्यायात काय झालं हे दिग्दर्शकाला सांगावं वाटत नाही किंवा कथेला परिपूर्णता आल्यामुळे तिला उगाच खेचण्यात अर्थ नाही असं कदाचित असू शकतं. १९९० साली आलेल्या ‘घायल’ सिनेमातला नायक अजय मेहरा जेव्हा खलनायक बलवंत रायला मारतो तेव्हा कथेची गरज त्याला पूर्णत्वाला नेते. त्याला जेल झाल्यावर त्याच्या कुटुंबाचं किंवा त्याचं पुढे काय झालं याला उत्तर राहत नाही. पण पटकथाकार-दिग्दर्शक सनी देओलला वाटतं अजय मेहराच्या आयुष्यात पुढे काय झालं ते सांगावं. आता अजय मेहरा (सनी देओल) सत्यकाम नावाच्या निर्भीड न्यूज चॅनलचा चालक-मालक आहे. तसेच तो पोलिसांना त्यांच्या अधिकाराच्या बाहेर असणाऱ्या केसेस मध्ये मदत करून रॉबिनहूड अशी प्रतिमा जप...

हायवे एक सेल्फी आरपार : आयुष्याचा कोलाज

Image
प्रवास सर्वचजण करतात. कधी स्वतःच्या वाहनाने, कधी खाजगी नाहीतर सरकारी बसने, कधी टॅक्सीत तर कधी ट्रकने. हा प्रवास कोणत्या आर्थिक थरातले आहात तसेच कुठे जायचे आहे यावर अवलंबून असतो. म्हणजे एखादी एनआरआय व्यक्ती ट्रकमध्ये लिफ्ट घेऊन प्रवास करणार नाही की ज्याची आर्थिक परिस्थिती खूपच कमी आहे ज्याला सरकारी किंवा खाजगी बस परवडणार नाही तो भाड्याने कार किंवा टॅक्सी नाही घेणार. तसच प्रवास आड बाजूच्या रस्त्याने न करता एखाद्या हायवेवर किंवा एक्स्प्रेस हायवेवर होणार असेल तर प्रवास करणाऱ्यासोबत असंख्य लोकं इतर गाड्यांमध्ये असतात. त्यावेळी जो व्यक्ती ज्या वाहनातून जात असेल तो आजूबाजूच्या गाड्यात कोण लोकं आहेत याचा विचार करत नाही. तो त्यांच्या आयुष्याला कुठेही छेदणार नाही किंवा ते त्याच्या आयुष्यात येऊन गोंधळ घालणार नाहीत. तरीही प्रवासा दरम्यान कधीतरी एखादा प्रवासी दुसऱ्याचा विचार करत असेल का! करतात का नाही हे सांगता नाही येत पण उमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी या पटकथाकार-दिग्दर्शक जोडीने तसा विचार केलेला आहे. हायवे सिनेमा चालू होतो मुंबईतल्या नेहमीच्या सकाळी. पडद्यावर दिसतं असंख्य पात्र वेगवे...