Posts

Showing posts with the label Pune

एक जुनी बातमी

1. ही एक जुनी बातमी . पाच वर्षांपूर्वीची. आज एका निमित्ताने याची आठवण झाली. लातूरच्या निखील गटागट नावाच्या मुलाने आपलं अपहरण झालंय व चोरट्यांनी जवळचे साठ हजार रूपये, मोबाईल, लॅपटॉप चोरून चोप देऊन वाशी पुलावरून पाण्यात टाकले असं पोलिसांना सांगितलं. तो पुण्यात सीओइपीला तिसऱ्या वर्षाला होता. पोलिसांनी पुण्यातली केस म्हणून पुणे पोलिसांकडे सुपूर्द केली. त्यांनी त्याला मार लागलंय म्हणून लातूरला पाठवलं. तोपर्यंत त्याचं अपहरण झालंय पण तो वाचलाय हे घरच्यांना कळलं. काही दिवसांनी पोलिसांनी परत एकदा चौकशीसाठी त्याला बोलावलं. त्यानं सांगितलेल्या घटनात संगती लागत नव्हती म्हणून त्यांनी त्याला विचारलं तो क्लासेस का अटेंड करत नाही व पाचव्या-सहाव्या सेमिस्टरचे रिझल्ट्स पण सांगितले.  तेव्हा त्याने आपण खोटच सांगितलंय असं कबूल केलं. तसेच हा सगळा बनाव त्यानेच रचलाय असंही कबूल केलं. इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात तो नापास झाला होता व त्याला अभ्यासक्रम झेपत नव्हता. त्या दरम्यान इंग्रजी क्राईम थ्रिलर्स वाचायची सवय लागली होती. ते वाचून आपणही लेखक व्हावे असं त्याला वाटायला लागलं. पण घरच्यांच्या अपेक्षा पूर...

प्रणव सखदेव, कविता दातीर आणि बालाजी सूर्यवंशी.

Image
जे घडून गेलं त्याचा खेद नाही पुढयात काय वाढलंय याची चिंता नाही आत्ता आहे पृथ्वीवर आहे पृथ्वी फिरतेय स्वतः भोवती सूर्याभोवती … प्रणवने लिहिलेल्या कवितासंग्रहातील एका कवितेच्या वरील काही ओळी. सर्व कविता आजच्या काळाशी निगडीत लिहिलेल्या आहेत त्यामुळे वाचायला सोप्या. माझ्यासारख्या कवितेच्या जवळ न फिरकणाऱ्या माणसाला तर यांच्यातलं फार काही कळत नाही. तसेच मराठीत सध्या कवितेत कोणता प्रवाह आहे किंवा नवं काय आहे ते पण माहित नाही. शाळेत क्रमिक पुस्तकात असणाऱ्या मराठी कविता ज्या आता आठवत पण नाहीत पण गाईडातून त्यांचे अर्थ समजून घेऊन त्यातलीच उत्तरं पाठ करून उत्तरं सोडवण्यापुरत्या वाचलेल्या. पुढे शाळा संपल्यावर अकरावीला सायन्स घेतलं, डॉक्टर होण्यासाठी. सायन्स घेतलं म्हटल्यावर सायन्स फिक्शन वाचणे ओघाने आलेच असा प्रघात नसला तरी जयंत नारळीकर, निरंजन घाटे, लक्ष्मण लोंढे यांच्या कथा-कादंबऱ्या आणि मोहन आपटे, बाळ फोंडके यांची वैज्ञानिक पुस्तके वाचायचा छंद लागला. डॉक्टरीला जाता आलं नाही कारण तेवढा अभ्यासच नव्हता. त्यामुळे मग कॉमर्स परत यु टर्न मारून बीएस्सी करत करत दोन्ही ठिका...

अनरउबिक आणि प्रकाशक

Image
परवा मंगळवारी सकाळी देशमुख आणि कंपनीच्या विनय हर्डीकरांना फोन लावला. त्यांना म्हणालो, "मागच्या महिन्यात एक हस्तलिखीत दिले होते. त्याबद्दल अभिप्राय हवा होता." ते म्हणाले, "मी ते वाचलंय. तू ते कार्यालयात येउन घेऊन जा." बुधवारी सकाळी कार्यालयात जाऊन हस्तलिखीत घेऊन आलो. देशमुख आणि कंपनी (पुणे) हे तिसरे प्रकाशक ठरले ज्यांनी अनरउबिक नाकारली. पहिले दोन म्हणजे पॉप्युलर प्रकाशन (मुंबई) आणि अनुबंध प्रकाशन (पुणे) . यानंतर मेनका प्रकाशन (पुणे) , सायन प्रकाशन (पुणे) , अनुबंध प्रकाशन (पुणे) , गोल्डनपेज प्रकाशन (पुणे) , जनशक्ती वाचक चळवळ (औरंगाबाद) यांनी सुद्धा नाकारली किंवा काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना स्वीकारता आली नाही. लोकवाङ्मय गृह (मुंबई) नी वेळेअभावी प्रकाशित करायची असमर्थता दर्शवली. गेल्या एक ते दोन वर्षांपासून मी प्रकाशकांना भेटतोय पण एकही जण त्याबद्दल ना बोलायला तयार आहे ना अभिप्राय द्यायला. त्यामुळे छापील आवृत्ती निघण्याचे दिवस मागे-मागे पडत चाललेत. काय करावे ते कळत नाही.  फक्त पॉप्युलरवाल्यांनी अभिप्राय दिला तो पण कसा!!! तो सोबत जोडला आहे. य...

लातूर पॅटर्न पहिला वर्धापन दिन

Image
आज लातूर पॅटर्नच्या प्रकाशन सोहळ्याचा पहिला वर्धापन दिन. कादंबरी प्रकाशित झाल्यावर मला बऱ्याच प्रमाणात त्याच्याकडून अपेक्षा होती की कादंबरी चर्चिली जाईल, परीक्षणं येतील, चर्चा घडेल, टीका होईल किंवा या पैकी काहीही होणार नाही. काहीही होणार नाही हे जास्त अपेक्षित होतं. असं का झालं याचा विचार करत होतो तेव्हा काही शक्यता लक्षात आल्या. १) मी जेव्हा हे लिहिलंय किंवा छापतोय असं मित्रांना सांगितलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया फारच थंड होती. असं का झालं! मला जाणवलेलं कारण म्हणजे माझे जवळपास सगळे मित्र हे मराठी किंवा इंग्रजी साहित्याचे वाचक नाहीत. यातले बरेच जण दररोजचा वर्तमानपत्रसुद्धा वाचत नाहीत. जे काही थोडेफार वाचक आहेत त्यांच्यापर्यंत कादंबरी पोचली नाही. २) माझ्या घरात कथा, कादंबरी, कविता किंवा एकूणच साहित्याविषयी कसलंही सोयरसुतक नाही. त्यामुळे घरातूनसुद्धा मला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. घरी मी एकटाच असा आहे ज्याला यात प्रचंड आवड आहे. ३) ज्या-ज्या लोकांनी कादंबरी वाचली ते सर्वजण पदवीधर आहेत ही बाब विचार केल्या नंतर लक्षात आली. त्यामुळे तिला दुर्लक्षित कर...