Posts

Showing posts from January, 2016

मस्तीजादे : अजीर्ण

Image
ऐंशीच्या दशकात हॉंगकॉंग सिनेमांनी कात टाकायला सुरुवात केली तेव्हा सॅमो हंग, जॅकी चॅन वगैरे प्रभूतींनी अॅक्शनला विनोदाची जोड देऊन अॅक्शन कॉमेडी या सिनेप्रकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर या सिनेमांची लाटच आली मराठीतल्या तमाशा व विनोदीपटांसारखी. जरी अॅक्शन कॉमेडी असली तरी त्यात विनोदाला ज्या पद्धतीने दाखवण्यात आलं ते खचितच योग्य होतं असं म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ सॅमो हंग दिग्दर्शित घोस्ट पंटिंग, पेडीकॅब ड्रायव्हर किंवा विनर्स अँड सिनर्स मालिकेतले पहिले दोन सिनेमे हे यासाठी बघता येतील. यातील विनोद हा विनोदाच्या नावाखाली काय दाखवू नये याचे आदर्श उदाहरणे ठरावेत. बाळबोध, अश्लील व चावट विनोदांची पखरण यात करून त्याला सुरुवातीला व शेवटाकडे उत्तम अॅक्शन दृश्यांची जोड दिलेली. त्यामुळे सिनेमे निव्वळ कथानकावर धकवून नेलेत असा प्रकार क्वचितच दिसलेला. हिंदीत सेक्स व अॅडल्ट कॉमेडीच्या नावाखाली जे दाखवलं जात आहे ते बघून वरील सिनेमांची आठवण होते. सनी केले (तुषार कपूर) व आदित्य चोटीया (वीर दास) हे मित्र एका जाहिरात कंपनीत काम करत असतात. जाहिराती बनवणं झालं की ते त्यांच्या चीक्स रेच्या सह...

साला खडूस : उत्तम होता होता राहिलेला...

Image
खेळाला केंद्रस्थानी ठेवणारे बरेच सिनेमे यापूर्वी आलेले आहेत. ते विषयाला कसे हाताळतात यावरनं त्यांची वर्गवारी करता येईल. लगानसारख्या सिनेमात त्याची वासाहतिक, सामाजिक व राजकीय बाजू दाखवण्यात आली. क्रिकेटला प्रतीकात्मक लढ्याचं स्वरूप दिलं गेलं. मेरी कोम, भाग मिल्खा भाग व पान सिंग तोमरमध्ये त्याची चरित्रात्मक बाजू दाखवण्यात आली. इक्बाल व चक दे इंडियामध्ये राजकारणाने खेळाडू व त्यांच्या प्रशिक्षकांवर होणारे परिणाम याला महत्व होतं. मिथुन चक्रवर्तीच्या बॉक्सरमध्ये सर्वसामान्य घरातला मुलगा बॉक्सिंग चँपियन कसा होतो असा विषय होता. जो जीता वही सिकंदरमध्ये सायकल स्पर्धा महाविद्यालयीन तरुणांसाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी महत्वाची असते. जन्नतमध्ये क्रिकेटमधील सामना निश्चिती व त्या अनुषंगाने एका नायकाचा उदयास्त दाखवला होता. त्याचप्रमाणे साला खडूस महिला बॉक्सिंगमधील गुरु-शिष्य नात्याकडे बघतो. अदि तोमर (आर. माधवन) हा पूर्वाश्रमीचा बॉक्सिंग चँपियन खेळातल्या राजकारणामुळे त्यातनं बाहेर फेकला गेला आहे. तो आता प्रशिक्षक म्हणून काम बघतो. देव (झाकीर हुसेन) राष्ट्रीय महिला बॉक्सिंग फेडरेशनचा अध्यक्ष ...

क्या कूल है हम ३ : अबघणीय

Image
काही सिनेमे का बनवले जातात याला उत्तर नाही. आर्थिक ताकत आहे म्हणून की सृजनशीलता ओसंडून वाहतेय म्हणून. याचं नेमकं उत्तर मिळणं अवघड आहे. कारण सृजनशीलता असली तरी तिला योग्य दिशा असणं अपेक्षित आहे. तिच्यात गांभीर्य हवं भलेही मांडला जाणारा विषय विनोदी असला तरी. निर्मात्याच्या विचारात गांभीर्य नसेल तर ते बाळबोध होतं. ते एकतर स्वतःच्या प्रेमात पडलेत असं म्हणता येईल किंवा आपण ज्यांच्यासाठी सिनेमा बनवलाय त्यांना त्यांनी गृहीत धरलंय असं म्हणता येईल. यातल्या दोन्हीही शक्यता नाकारता येत नाही. एकता कपूर व शोभा कपूर निर्मीत व उमेश घाडगे दिग्दर्शित क्या कूल है हम ३ हा अशाच सृजनशीलतेचं उत्तम उदाहरण ठरावा असा सिनेमा आहे. कथेनुसार कन्हय्या (तुषार कपूर) व रॉकी (आफताब शिवदासानी) हे दोन मित्र त्यांचा मित्र मिकी (कृष्णा) याच्या अडल्ट सिनेमात हिरोचं काम करत असतात. कन्हय्याचे त्याच्या वडिलांशी (शक्ती कपूर) जमत नसते. इकडे सिनेमात काम करता करताच तो शालूच्या (मंदना करिमी) प्रेमात पडतो. तिचं प्रेम मिळवण्यासाठी तो त्याच्या सिनेमातील अभिनेत्यांना घेऊन एक नाटक रचतो तिच्या बापावर सूर्या करजात्यावर (दर्शन जर...

एअरलिफ्ट : दिग्दर्शनातील नवखेपणा शौर्यकथेच्या मुळाशी

Image
१ ऑगस्ट १९९० ला इराकने कुवैतवर अचानक हल्ला केला. कारण उघड होतं दुसऱ्या महायुद्धानंतर कच्च्या तेलाला आलेलं अनावश्यक महत्व, जागतिक सत्ता हवी असेल तेलावरील सार्वभौमत्व अंगीकारणं गरजेचं होतं सोबत अमेरिकेला शह देणे सुद्धा. त्याचाच एक भाग म्हणून सद्दाम हुसैननी कुवैतवर हल्ला केला. पुढे अमेरिका त्यात सामील झाली जे आज गल्फ वॉर म्हणून परिचीत आहे. त्याच काळात कुवैतमध्ये असणाऱ्या काही लाख भारतीयांनी जीव मुठीत घेऊन तिथनं निघायचा प्रयत्न केला. या प्रयाणात इंडिअन एअरलाईन्सने खूप मोठी जबाबदारी घेऊन जवळ जवळ सर्व भारतीयांची सुटका केली. त्यांना यासाठी एकोणसाठ दिवस व चारशे अठ्ठ्याऐंशी फ्लाईट्स कराव्या लागल्या. याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली. एअरलिफ्ट त्याच शौर्याची कथा एका कुटुंबाला केंद्रस्थानी ठेऊन दाखवतो. रणजीत कटीयाल (अक्षय कुमार) हा भारतीय पण स्वतःला कुवैती समजणारा श्रींमंत उद्योगपती त्याच्या आयुष्यात खुश आहे. कुवैती सरकार मधल्या वरिष्ठांशी जवळकीचे संबंध ठेऊन तो उद्योगधंदा वाढवण्यात मश्गुल आहे. त्याला भारतीयांचा व भारतातील भ्रष्टाचाराचा तिटकारा आहे. त्याची पत्नी ...

वजीर : एक डाव वजिराचा

Image
बुद्धिबळात कशाला महत्व असते चालींना की प्रतिचालींना! चाली खेळणारा शेवटी चेकमेट म्हणतो की प्रतिचाली खेळणारा. ज्याने कुणी पहिल्यांदा चेकमेट म्हटले त्याने खेळ जिंकला असा बुद्धिबळाचा सरळ हिशोब असतो. हाच हिशोब प्रत्यक्ष आयुष्याला लावता येईल. बुद्धिबळाच्या चाली आयुष्यातल्या घटनांचा मागोवा काढण्यासाठी वापरता येतील. बुद्धिबळात खेळ जिंकणे इतकेच अंतिम असते तेव्हा त्यासाठी केल्या गेलेल्या चाली-प्रतीचालींना महत्व ते किती राहते. प्रतिस्पर्धी असणाऱ्या भिडूची मानसिकता याने भेदता येते . या प्रश्नांची उत्तरे कदाचित प्रत्यक्ष आयुष्यातल्या घटनांना लावता येणार नाहीत. आयुष्यातील कटू प्रसंग इतके सहजासहजी सुटणार नाहीत तरीही ते शक्य होऊ शकतं जर त्याचा विचार केला गेला असेल तर. निदान विधू विनोद चोप्रा व बिजॉय नाम्बियार यांनी तसा विचार केलेला दिसतो. दानिश अली (फरहान अख्तर) हा एटीस ऑफिसर आपली बायको रुहाना अली (आदिती राव हैदरी) व मुलगी यांना घेऊन गाडीतनं निघाला आहे. एके ठिकाणी रुहानाच्या तुटलेल्या घुंगरांना शिवण्यासाठी एका संगीत वाद्ये विकणाऱ्या दुकानासमोर थांबतात. दानिशला तेवढ्यात रस्त्याच्या पलीकडे ...

नटसम्राट असा नट होणे नाही : प्रभावी पण...

Image
साहित्य किंवा नाट्यकृती सिनेमात रुपांतरीत करताना असंख्य गोष्टींचं भान ठेवायला लागतं. आपण सिनेमा करतोय व त्यानुसार पटकथा लिहायला हवी असं अपेक्षित आहे. साहित्य असो की नाट्यकृती त्यात सिनेमाला साजेसं कथानक येण्यासाठी कमी जास्त बदल सुद्धा स्वागतार्ह. तो बदल नुसता सिनेमॅटीक बदल न वाटता विश्वसनीय वाटायला हवा तरच प्रेक्षक सिनेमाला खिळून राहिल. तसेच हा बदल विश्वसनीय आहे म्हणून भागत नाही तर दिग्दर्शकीय कौशल्याने ते पडद्यावर प्रभावी वाटणं गरजेचं असतं. जेव्हा नाट्यकृती किंवा साहित्यकृती ही अजरामर असं नामाभिधान घेऊन तेव्हा त्याचं रुपांतर हे त्याच्या मूळ संहीतेसोबत तुलनात्मक दृष्ट्या बघितलं जातं. त्याला रुपांतरीत करताना काय बदल केले यापेक्षा ते कितपत प्रभावी ठरलं याचीच जास्त उत्सुकता असते कारण मूळ कलाकृती ही बघणाऱ्याच्या मनात ठसलेली असते तेव्हा त्या ठसलेल्या प्रभावाची परत आठवण करून देणं प्रेक्षकांसाठी क्रमप्राप्त ठरतं. नटसम्राट हे वि. वा. शिरवाडकरांनी लिहिलेलं नाटक एका नटाच्या आयुष्याची होणारी शोकांतिका दाखवतं. रंगभूमीवर अजरामर पात्र उभं करणारा गणपतराव उर्फ अप्पासाहेब बेलवलकर हा नट प्रत्य...