Posts

Showing posts with the label Hindi Film

अनुराधा आपटे आणि आमची पिढी

Image
[ सूचना: त्रिभंग सिनेमातील काही महत्त्वाच्या प्लॉट पॉईंट्सची सविस्तर चर्चा लेखात होणार आहे. त्यामुळे ज्यांनी सिनेमा बघितला नसेल त्यांनी लेख वाचू नये, ही नम्र विनंती.] रेणुका शहाणे लिखीत-दिग्दर्शित त्रिभंग सिनेमा तीन स्त्रिया व पिढ्यांची कहाणी सांगतो. नयनतारा आपटे, अनुराधा आपटे व अनुराधाची मुलगी माशा या अनुक्रमे आजी, आई व मुलगी यांची कथा आहे. पैकी नयनतारा आपटे या साहित्य अकादमी विजेत्या लेखिका. अनुराधा आपटे ही ओडिसी नृत्यांगणा व बॉलीवूड अभिनेत्री, तर माशा ही सर्वसामान्य घरातील सून. तिघींची विश्वे वेगळी. त्यांच्यात म्हटला तर संवाद आहे म्हटला तर नाही. नयनतारा ब्रेन स्ट्रोक झाल्यामुळे कोमात जातात इथनं सिनेमाची सुरूवात होते. तत्पूर्वी अनुराधा आपटे कशी आहे याची चुणूक तिच्या ओडिसी नृत्याच्या कार्यक्रमा आधी मेकअप रूममधील छोटेखानी प्रसंगात दिसून येतं. तिला सिगरेट ओढण्याची सवय असते. ती पाकिटातून सिगरेट काढून पेटवणार असते की तिची मुलगी व तिचा बॉयफ्रेंड तिला नको ओढूस म्हणतात. ती लगेच प्रतिक्रिया देते की तू मॉरल पोलीस होऊ नकोस. मी ओढणारच म्हणते. पुढच्याच प्रसंगात आईला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलंय म्...

शाश्वत सचदेवचं चिरकाळ स्मरणात राहणारं पार्श्वसंगीत – उरी

Image
सिनेमातील पार्श्वसंगीताबद्दल ए. आर. रेहमान म्हणतात, “काही सिनेमांमध्ये पार्श्वसंगीत हे वॉलपेपरसारखं असतं व इतरांमध्ये ते एक पात्र असतं.” २०१८ मध्ये श्रीदेवी अभिनीत ‘मॉम’ सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारात उत्कृष्ठ पार्श्वसंगीताचा पुरस्कार मिळाल्यावर ते बोलत होते. मॉम पार्श्वसंगीत ज्युकबॉक्स हिंदी सिनेमाचा विचार केला तर लक्षात येईल पार्श्वसंगीताला फारसं महत्त्व दिलं जायचं नाही किंवा दिलं गेलं तरी ते गाणी, गाण्यांचं संगीत व कथानकात त्याचं अस्तित्व जाणवायचं नाही. एकुणात ते नसल्यासारखच होतं. त्यामुळे जेव्हा रेहमान पार्श्वसंगीत हे पात्र असतं असं म्हणतात तेव्हा ते नक्कीच आर. डी. बर्मनबद्दल बोलत असावेत असं वाटतं. पार्श्वसंगीतातला बाप असं आरडींना म्हटलं तर वावगं ठरू नये. आर. डी. नी खऱ्या अर्थाने पार्श्वसंगीत हे सिनेमाला इतर गोष्टीं इतकच महत्वाचं असतं हे त्यांच्या कामातून दाखवून दिलं. ‘शोले’ हे मोठं उदाहरण. शोलेचा टायटल ट्रक किंवा बसंतीच्या मागे दरोडेखोर लागतात तो प्रसंग असू दे. आरडीचं संगीत प्रसंगाला साजेसं. सिनेमाला उठावदार करण्याचं काम किती महत्वाचं असतं हे शोले आणि दीवारमधील काम बघून लक्षात यावं...

चिंटू का बर्थडे आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्स

Image
विसाव्या शतकाची असंख्य वैशिष्ट्ये आहेत. पैकी एक म्हणजे जगभरात स्थलांतरितांचा झालेला प्रवास. एका देशातून दुसऱ्या देशात जाणाऱ्यांची संख्या विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात झाल्याची दिसून येते. खासकरून पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपातून अमेरिकेत व त्यानंतर जगाच्या इतर भागातून युरोप अमेरिकेत स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली दिसून येते. स्थलांतरित होण्याची कारणे बरीच आहेत. पैकी आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक ही मुख्य कारणे. आर्थिक कारण हे त्यातल्या त्यात ठळकपणे स्थलांतरित होण्यासाठी मजबूर करणारं. स्थलांतरित जरी वैध मार्गाने होणारं असलं तरी अवैध मार्गाने होणाऱ्यांची संख्या सुद्धा तितकीच आहे. किंवा असे म्हणता येईल वैध मार्गाने जाणाऱ्यांपेक्षा अवैध मार्गाने जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. लालफितीच्या कारभारामुळे वैध ऐवजी अवैध मार्ग स्वीकारणारे बरेच दिसतात. त्यामुळे आजच्या काळात स्थलांतरितांचं जगणं ही एकाचवेळी त्या त्या भूभागासाठी पर्वणी आहे तर समस्या सुद्धा. पर्वणी या अर्थाने की शिकून नोकरी, व्यवसायासाठी जाणारा वर्ग हा तिथल्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी आयुष्य...

न भावलेला ‘सुपर ३०’

Image
ऋतिक रोशन अभिनीत ‘सुपर ३०’ मधील सर्वात चांगला प्रसंग म्हणजे आनंदकुमारला लल्लनमुळे आपण किती मोठी घोडचूक केली याची जाणीव होते तो. सिनेमातील इतर गोष्टी मात्र नेहमीची कथा वाटली. मी व्यक्तिशः शिक्षणव्यवस्थेवरील भारतीय सिनेमांपासून दूरच राहतो. त्याला एक कारण आहे. मी एकूण बारा वर्षे महाविद्यालयात घालवली आहेत. बारावी सायन्सची दोन, बीकॉमची दोन, बीएस्सीची तीन वर्ष (बीकॉम-बीएस्सी मिळून पाच वर्ष. सर्व विषयात नापास.) आणि त्यानंतर बीए-एमए. महत्त्वाच्या सर्व विद्याशाखांचा अनुभव घेतल्यामुळे एकूणच शिक्षणाबद्दल आजही मनात कटुताच आहे. त्यामुळे सिनेमात जेव्हा शिक्षणावर भाष्य केल्याच्या थाटात कथा मांडली जाते तेव्हा मला त्याचवेळी अंदाज आलेला असतो की कथानक खूपच ढोबळ स्वरूपात मांडलेलं असणार. वास्तव दाखवण्याचं धारिष्ट्य अजून तरी निर्माता-दिग्दर्शकांनी दाखवलेलं नाही. चर्चेपुरती चटकन आठवणारी नावे म्हणजे ‘दहावी फ’, ‘तारे जमीं पर’ आणि ‘थ्री इडियट्स’. तिन्हीत शिक्षणव्यवस्थेचं बऱ्यापैकी चित्रण केलं आहे. तरीही मला हे सिनेमे तितकेसे प्रभावी वाटत नाहीत जितके ते असावयास हवेत. त्याचं कारण आपल्या सामाजिक रचनेत व नेणीवेत आह...

तारूण्यातला हॉलिवुडचा न पुसला जाणारा ‘डीऽऽऽप इम्पॅक्ट’

Image
केंद्रसरकारच्या ‘ मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन ’ च्या २०१७ च्या अहवालानुसार १५ ते ३४ हे भारतीय युवक/युवतींचं तरूणपणाचं ठरवलेलं वय आहे. याचा विचार केला तर माझं तरूण असण्याचं वय कधीच सरलंय. मी तरूण राहिलो नाही असं केंद्र सरकारला वाटतंय म्हटल्यावर ते बरोबरच असणार. तारूण्य हे आकड्यांवर नसतं, असं आपण नेहमी म्हणतो. ‘ मन करा रे प्रसन्न , सर्व सिद्धीचे कारण ’   असा सुविचार शाळेच्या भिंतीवर वाचलेला आठवतो तेव्हा वाटतं हेही खरंय. तसं पाहिलं तर दोन्हीतही तथ्य आहे. सुविचार मनात बिंबवला तर वयाचा अडसर कधीच येणार नाही. सरकारी आकडे खरे मानले तर आपण नेमकं त्याकाळात काय करत होतो याचं सिंहावलोकन करायची ही वेळ आहे असं वाटतं. मी हे आकडेच गृहीतक मानून बोलणार आहे. १५ ते ३४ म्हणजे १९९६ ते २०१५ हे माझं तरूण असण्याचं वय. या वयाचा विचार केला तर सर्वसाधारण तरूण हे दहावी , बारावी , पदवीधर व पदव्युत्तर पदवीधर होणे या टप्प्यातून जातात. मग नोकरी/व्यवसायाच्या मागे लागतात. त्यात जम बसतोय असं वाटायला लागलं की लग्न करतात. संसार चालू होतो. काही फॅमिली प्लॅनिंग वगैरे केलं नसेल तर लग्नाच्य...

हिंदीतील आश्वासक कथानके

Image
‘आर्टिकल १५’ च्या पोस्टरवर ‘फर्क बहुत कर लिया , अब फर्क लायेंगे’ किंवा ‘स्त्री’ सिनेमाची टॅगलाईन ‘मर्द को दर्द होगा’ त्यांच्या विषयवस्तूचा वेगळेपणा चटकन जाणवून देतात. तसेच हे दोन्ही सिनेमे वेगवेगळ्या सिनेप्रकारांचं प्रतिनिधीत्व करतात. ‘आर्टिकल १५’ समकालीन भारतीय जातव्यवस्थेचं चित्रण करतो तर ‘स्त्री’ विनोदी-भयपटाच्या साच्यात भारतीय मानसिकतेवर भाष्य करतो पण त्याचं मनोरंजन मूल्य कमी होऊ देत नाही. ‘स्त्री’ सिनेमाचं यशस्वी होणं हिंदी सिनेमातल्या बदलत्या ट्रेंड्सचा भाग म्हणावा का? की फक्त एक चांगली कथा, चांगलं दिग्दर्शन व ओळखीचे अभिनेता-अभिनेत्री असल्यामुळे प्रेक्षकांना तो आवडला असेल. गेल्या काही वर्षात हिंदी व्यावसायिक सिनेमांनी एकाचवेळी चांगल्या कथा उत्तम पटकथेद्वारे मांडायचा सपाटा लावलाय त्याचाच हा परिपाक म्हणावा का? म्हटलं तर हो म्हटलं तर नाही. हिंदी व्यावसायिक सिनेमात पटकथेला नेहमीच दुय्यम स्थान राहिलं आहे . खासकरून अमिताभच्या सिनेमांमध्ये पटकथेपेक्षा संवादांना महत्त्व जास्त देण्यात आलं. सलीम-जावेदनी संवादांना इतर गोष्टींपेक्षा सिनेमाच्या अग्रभागी ठेवलं. त्यामुळे अमिताभ व त्यानंत...

राझी : एक चांगला गुप्तहेरपट

Image
गैरों पे करम, अपनो पे सितम या लताच्या आवाजातील गाण्यात माला सिन्हा तिच्या मनातील भावना धर्मेंद्रला गाऊन दाखवते. सिनेमा आँखें . साल १९६८. धर्मेंद्र जरी ते ऐकत असला तरी व त्याला तिच्या भावना समजत असल्या तरी त्याच्यासाठी त्याचं काम, कर्तव्य अधिक महत्वाचं असतं. कारण तो एक गुप्तहेर असतो. आँखें काही भारतातील पहिला गुप्तहेरपट नव्हता. जेम्स बॉंडच्या डॉ. नो ने प्रेरित झालेला तेलगु सिनेमा गुडाचारी ११६ (१९६६) हा पहिला गुप्तहेरपट होता. ज्याचा रिमेक हिंदीत लगेच फर्ज नावाने बनवला गेला. त्यातलं हम तो तेरे आशिक है, सदियों पुराने हे जितेंद्र-बबितावर चित्रित झालेलं गाणं जितेंद्रच्या खास नृत्याच्या शैलीमुळे व लता-मुकेशच्या आवाजामुळे प्रचंड प्रसिद्ध पावलेलं. त्यामुळे हिंदी सिनेमाला गुप्तहेरपटाचं नाविन्य नाही. या दोन्ही सिनेमांच्या पटकथा अशा होत्या की नायकाला किंवा नायिकेला त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवण्यासाठी गाण्याचा व नृत्याचा आधार घ्यावा लागावा. अर्थात गाणेविरहित हिंदी सिनेमा हा प्रकारच तेव्हा अस्तित्वात नव्हता. त्यामुळे त्यांच्या सिनेमाच्या तार्किकतेत ते योग्यच होतं. आज प्रदर्शित झालेल...