Posts

एक जुनी बातमी

1. ही एक जुनी बातमी . पाच वर्षांपूर्वीची. आज एका निमित्ताने याची आठवण झाली. लातूरच्या निखील गटागट नावाच्या मुलाने आपलं अपहरण झालंय व चोरट्यांनी जवळचे साठ हजार रूपये, मोबाईल, लॅपटॉप चोरून चोप देऊन वाशी पुलावरून पाण्यात टाकले असं पोलिसांना सांगितलं. तो पुण्यात सीओइपीला तिसऱ्या वर्षाला होता. पोलिसांनी पुण्यातली केस म्हणून पुणे पोलिसांकडे सुपूर्द केली. त्यांनी त्याला मार लागलंय म्हणून लातूरला पाठवलं. तोपर्यंत त्याचं अपहरण झालंय पण तो वाचलाय हे घरच्यांना कळलं. काही दिवसांनी पोलिसांनी परत एकदा चौकशीसाठी त्याला बोलावलं. त्यानं सांगितलेल्या घटनात संगती लागत नव्हती म्हणून त्यांनी त्याला विचारलं तो क्लासेस का अटेंड करत नाही व पाचव्या-सहाव्या सेमिस्टरचे रिझल्ट्स पण सांगितले.  तेव्हा त्याने आपण खोटच सांगितलंय असं कबूल केलं. तसेच हा सगळा बनाव त्यानेच रचलाय असंही कबूल केलं. इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात तो नापास झाला होता व त्याला अभ्यासक्रम झेपत नव्हता. त्या दरम्यान इंग्रजी क्राईम थ्रिलर्स वाचायची सवय लागली होती. ते वाचून आपणही लेखक व्हावे असं त्याला वाटायला लागलं. पण घरच्यांच्या अपेक्षा पूर...

कॉपीचा लातूर पॅटर्न

Image
आज लोकसत्तेच्या पहिल्याच पानावर ही बातमी वाचली. यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही जाणवलं नाही. लोकसत्तेला का त्यात वेगळेपणा दिसून आला काय माहिती. कदाचित कधीकाळी लातूर पॅटर्नमुळे इथल्या विद्यार्थ्यांचं नाव महाराष्ट्रात आदरानं घेतला जात होतं म्हणून असेल कदाचित. ही मुलं खरंच हुशार असतात का (हुशारी कशावरून जोखतात त्याचं त्यांनाच माहित.) याची चौकशी या पेपरने केलेली ऐकिवात नाही. तरीही कॉपीचा लातूर पॅटर्न असं हेडिंग देऊन किती शर्मानक बात है अशा पद्धतीचं वगैरे त्यात लिहिलेलं आहे. ‘गुणवत्तेचा’ (परीक्षेत भरमसाठ मार्क्स घेणे जर गुणवत्ता असेल तर धन्यच गोष्ट आहे.) लातूर पॅटर्न निर्माण करून राज्यातून इथे स्थलांतरित व्हायला लोकांना भाग पाडलं होतं म्हणे. पण एकूणच ही बातमी वाचून बऱ्याच वर्षांपूर्वीचे काही किस्से आठवले.  वर्ष : १९९६ परीक्षा : १० वीची स्थळ : देशिकेंद्र विद्यालय, लातूर या वर्षी मी दहावीत होतो. वरील शाळेत वार्षिक परीक्षेचा नंबर आलेला. लातूर पॅटर्नचा भरभराटीचा काळ. मी ज्या वर्गात बसलो होतो त्याच वर्गात सदानंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, लातूरचे विद्यार्थी होते. ...

दंगल : गीताध्याय

Image
गेल्या काही महिन्यांमध्ये ट्रेलरवरून सिनेमा कसा असेल याचे अंदाज सोशल मेडियावर मांडले की घमासान चर्चा वाचण्यात येते. निव्वळ ट्रेलरवरनं सिनेमाची यथायोग्यता तपासण्यात येऊ नये असं विरोधकांचं म्हणणं. पण सिनेमा प्रदर्शित झाल्यावर ट्रेलरवरून सिनेमा समजतो असं म्हणणाऱ्यांना तो तोंडघशी पाडत नाही. ट्रेलर उत्सुकता वाढवणारा व आशयाला समोर आणणारा असेल तर प्रेक्षक नक्कीच थिएटरमध्ये येणार. दंगलचं ट्रेलर प्रदर्शित व्हायला लागल्यावर तो चांगलाच असणार असे सकृतदर्शनी तरी वाटत होते. सिनेमा निराश करत नाही तर एक प्रेरणादायी कथा मांडतो. हरियाणामधल्या बलाली इथल्या महावीर सिंग फोगाटला (आमीर खान) घरच्या अडचणींमुळे कुस्ती सोडून नोकरी करावी लागते पण त्याचं खेळाडू मन त्याला बसू देत नाही. आपल्याला मुलगा झाला तर तो देशाला सुवर्ण पदक मिळवून देईल या आशेवर तो असतो. त्याच्या दुर्दैवाने त्याला चारही मुलीच होतात. भारतीय रिवाजानुसार त्यांना रांधा, वाढा, उष्टी काढा यातच आयुष्य व्यथित करावं लागणार व आपलं स्वप्न भंगणार असं वाटत असतानाच समवयस्क मुलांनी दिलेल्या शिव्या न सहन होऊन गीता (झायरा वासिम, लहान व फातिमा सना शेख,...

घर

ऐंशीचं दशक संपण्याच्या दोन वर्षे आधी त्या गृहस्थांनी औरंगाबादसारख्या त्यावेळच्या शहरात सिडकोमध्ये प्लॉट विकत घेऊन घर बांधणं हे दिव्यच होतं. जुन्या औरंगाबादेत मुलांसहित काढल्यावर मध्यमवर्गीय मानसिकतेला अनुसरून त्यांनी सिडकोत घर बांधण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा घरात छोटासा भुकंपच झाला. कुठे तिकडे जाता, माणसं तोडायची आहेत का वगैरे बोलणं ऐकून ते घर बांधायच्या निर्णयावर ठाम राहिले. त्यावेळी आजच्यासारखं बिल्डरला घर बांधायला देणं वगैरे नसल्यामुळे गवंड्याला हाताशी धरून घर बांधायला सुरुवात केली. त्याने त्याच्या स्वभावाला अनुसरून घर बांधलं ज्याची शाश्वती तो सुद्धा देऊ शकला नसता. त्यामुळे घरात जी आय पाईप्सचे जाळे, त्यावेळच्या पद्धतीचा किचन ओटा-सिंक, स्पंज केलेल्या भिंती, त्यांना सिमेंट कलर्स मारलेले, भिंती पुढील काळात पावसात ओल धरणाऱ्या, भिंतीत फळ्या असणारी कपाटं, छताला गिलावा नसणे, काचा बसवलेल्या/न बसवलेल्या लोखंडी खिडक्या अशा अवतारात एक बेडरूम, हॉल, किचनचं ते घर सिडकोत इतर तुरळक घरांबरोबर दिमाखात उभं राहिलं. गृहस्थांना दोन मुले व दोन मुली. मुली नेहमीप्रमाणे दिल्या घरी सुखी राहिल्या...

प्रतिमा संवर्धनाचा सोस

Image
चरित्रपट किंवा कुठल्याही गंभीर विषयावर सिनेमा लिहिताना त्यातील वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवूनच लिहायला हवेत असा एक गैरसमज आपल्या इथे आहे. त्यामुळेच उडता पंजाबसारख्या सद्यस्थितीवर आधारित सिनेमाला विरोध करताना अनावश्यक मुद्द्यांची चर्चा केली जाते. प्रसंगी बंदी घालण्याची भाषा केली जाते. आक्षेपार्ह गोष्टी काढून टाकव्यात म्हणून बालिश सूचना केल्या जातात. राजकीय दबावतंत्राचा वापर केला जातो. खरंतर हे आपल्या समाजातूनच येतं जिथे प्रतिमा संवर्धन ही इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा जास्त महत्वाची. लहानपणापासून याचे बाळकडू दिले जातात किंवा लहान मुले याच वातावरणात वाढत असल्यामुळे आजूबाजूला बघूनच शिकतात. हयातभर प्रतिमा संवर्धन करण्यातच या संस्कृतीतल्या लोकांची ऊर्जा खर्ची होते. त्यामुळे सिनेमासारख्या माध्यमातून जेव्हा चरित्रपट येतात तेव्हा किमानपक्षी त्रयस्थ भूमिकेतून मांडत असणारा विषय त्याच्या सर्व पदरानिशी येणं अपेक्षित आहे. एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी हा चरित्रपट त्याला अपवाद ठरत नाही. रांचीमध्ये जन्मलेला महिन्द्रसिंग धोनी (सुशांत सिंग राजपूत) हा पानसिंग धोनी (अनुपम खेर) यांचा मुलगा शाळ...

लई लवकर एक्झिट घेतलीत सर...

Image
शिरीष निर्मळे एका सामाईक मित्रामुळे आपली ओळख झाली. तेव्हा तुम्ही तुमच्या नेक्स्ट जनरेशन मासिकाचे काम करत होतात. आपला सामाईक मित्र संपादक होता. आपल्या अंका तर्फे आपण अन्वयार्थ दिवाळी अंक काढण्याच्या बेतात होतात. मी म्हटलं विशिष्ट विषयाला अंक वाहिल्यापेक्षा आपण दरवर्षी दिवाळी जसे वाचतो तसा एखादा अंक लातुरातनं काढावा अशी कल्पना मांडली. तुम्ही व मित्राने लगेच ती उचलून धरली. त्याला येणारा खर्च वगैरे बाबी ठरल्यावर कामही सुरु झालं. अंकासाठी जाहिराती तुम्हीच गोळा करणार होतात. तुमचं ते क्षेत्रच म्हणा. जाहिरात व्यवस्थापक म्हणून काम करत असल्यामुळे जाहिरातींबाबत आम्ही निश्चिंत होतो. फक्त अंकात काय, असावं काय असू नये याबद्दलच चर्चा व्हायच्या. तुम्ही आम्हाला पूर्ण स्वातंत्र दिलं होतं त्यामुळं आम्ही पण जोशाने कामाला लागलो. अंकाचं काम दररोज नाहीतर किमान एक दिवसा आड तरी कुठपर्यंत आलंय हे सांगण्याचं बंधन मात्र होतं. त्यामुळे बऱ्याचदा चहाच्या निमित्ताने किंवा तुमच्या दुकान कम ऑफिसात आपण बसत असू त्यावेळी अंका व्यतिरिक्त इतरही बाबींवर बोलणं व्हायचं. त्यात तुम्ही एक फ्लॅट बुक केलय व लवकरच तिथे राहा...

हॅप्पी भाग जायेगी: हॅप्पी सियाप्पा

Image
एसीपी उस्मान आफ्रिदीला हॅप्पीला शोधण्यासाठी सांगण्यात आलंय. तो हाताखालच्या लोकांना सांगतोय की लाहोर शहरात कसं कसं तिला शोधायचं. ते सांगता सांगता तो म्हणतो ज्यांना यात भाग घ्यायचा नाही त्यांनी एक पाऊल मागे जावं. एक पोलीस कॉन्स्टेबल पाठीमागे पाय टाकतो तर तो अधांतरी राहतो कारण ते पोलीस स्टेशनच्या गच्चीवर असतात. प्रसंग छोटासाच पण प्रचंड हसवणारा व लक्षात राहणारा. दुर्दैवाने मुदस्सर अझीझ लिखीत व दिग्दर्शित हॅप्पी भाग जायेगीमधला हा प्रसंग एकमेव असा राहतो. असे चांगले प्रसंग नंतर व त्या आधी बघायला मिळत नाहीत. हरप्रीत कौर उर्फ हॅप्पी (डायना पेंटी) तिच्याच लग्नामधून पळून जाते. ती ज्या ट्रकमध्ये आसरा घेते तो बिलाल अहमदचा (अभय देओल) असतो. तिला जाणीव होते तेव्हा ती लाहोरमध्ये त्याच्या घरी असते. इकडे भारतात अमृतसरमध्ये तिचा होणारा नवरा दमण सिंग बग्गा (जिमी शेरगील), प्रियकर गुरदीप उर्फ गुड्डू (अली फैझल) व वडील (कंवलजीत सिंग) तिला शोधण्यासाठी पंजाब पालथा घालत असतात. बिलालला जेव्हा कळतं की हॅप्पी चुकून त्याच्या ट्रकमध्ये आलीय तेव्हा तो तिला वापस भारतात पाठवण्याची तयारी करायला लागतो. यासाठी त्...